भारत एका दिवसात तीन संघ उतरवू शकतो – स्टार्क

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने भारतीय संघाच्या प्रतिभेची प्रशंसा करताना मोठे विधान केले आहे. त्याच्या मते, भारत हा एकमेव देश आहे जो एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी तीन वेगवेगळे संघ उतरवून तुल्यबळ स्पर्धा करू शकतो.
स्टार्क लवकरच आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये तो दुखापतीमुळे सहभागी होऊ शकला नाही, मात्र आता तो आयपीएलमध्ये खेळण्यासाठी उत्सुक आहे. भारतात पोहोचल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना त्याने भारतीय क्रिकेटच्या खोलीची प्रशंसा केली. त्याने म्हटले, “भारत एकमेव असा देश आहे जो त्याचा टेस्ट संघ ऑस्ट्रेलियात, वनडे संघ दक्षिण आफ्रिकेत आणि टी-२० संघ दुसऱ्या देशात पाठवू शकतो आणि तरीही ती सर्व संघ अतिशय स्पर्धात्मक राहतील.”
आयपीएलमुळे भारताच्या या सामर्थ्याला चालना मिळते का, या प्रश्नावर त्याने थेट उत्तर दिले नाही. मात्र, त्याने मान्य केले की “आयपीएल जगातील सर्वोत्तम लीग आहे. येथे भारतातील सर्व प्रतिभावान खेळाडू खेळतात आणि यामुळे भारतीय क्रिकेट अधिक बळकट झाले आहे.”