जगातील कोणते शहरं आहेत सर्वाधिक धोक्यात, जाणून घ्या हवामानशास्त्रज्ञ काय म्हणतात?

जगातील सुमारे अर्धी लोकसंख्या शहरी भागात राहते, त्यामुळे शहरांमध्ये उष्णता वाढत आहे आणि हवामान बदलाचा परिणाम अधिक तीव्र होत आहे. आंतरराष्ट्रीय दानसंस्था वॉटरएडच्या ताज्या अभ्यासानुसार, अनेक मोठी शहरे पाण्याशी संबंधित नैसर्गिक आपत्तींच्या जोखमीस सामोरी जात आहेत. गेल्या चार दशकांतील डेटाचे विश्लेषण करून १०० हून अधिक शहरांतील हवामान बदलांचा अभ्यास करण्यात आला असून, यामध्ये पूर आणि दुष्काळाची तीव्रता मोठ्या प्रमाणावर बदलल्याचे आढळले आहे.
या अभ्यासानुसार, माद्रिद, काइरो, हाँगकाँग, रियाध आणि जेद्दासारखी शहरे आता दुष्काळाचा सामना करत आहेत, जिथे पूर्वी पूर येण्याची शक्यता होती. तर भारत, पाकिस्तान, नायजेरिया आणि कोलंबियाच्या पारंपरिक कोरड्या शहरांमध्ये आता पूराचा धोका वाढला आहे. तज्ज्ञांच्या मते, ही शहरे पूर्वीच्या हवामान परिस्थितीनुसार बांधण्यात आली होती आणि सध्याच्या बदललेल्या परिस्थितीत ती टिकाव धरू शकत नाहीत. वॉटरएडच्या अहवालानुसार, या हवामान बदलामुळे फक्त पाण्याचा प्रश्न निर्माण होत नाही, तर आरोग्य, शिक्षण आणि उपजीविकेवरही गंभीर परिणाम होतो. त्यामुळे शहरांनी योग्य उपाययोजना करून पायाभूत सुविधा मजबूत करणे गरजेचे आहे.