रोज प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पिता? शरीराचे होणारे नुकसान जाणून घ्या

सध्याच्या काळात प्लास्टिकचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः कार्यालये किंवा शाळेत पाणी नेण्यासाठी प्लास्टिकच्या बाटल्यांचा अधिक वापर केला जातो. अनेकजण घरी देखील पाणी पिण्यासाठी प्लास्टिकच्या बाटल्या ठेवतात. परंतु, जर तुम्ही रोज त्याच प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पित असाल तर ते शरीरासाठी अत्यंत घातक ठरू शकते.
जुनी प्लास्टिकची बाटली दीर्घकाळ वापरल्यास कॅन्सरचा धोका वाढतो.
प्लास्टिकच्या बाटल्या बनवण्यासाठी ‘बिस्फेनॉल ए’ (BPA) आणि इतर अनेक घटकांचा वापर केला जातो, जे शरीरासाठी हानिकारक असतात. जर या प्रकारच्या बाटल्यांमधून सतत पाणी प्यायले, तर त्या बाटलीतील हे हानिकारक घटक शरीरात प्रवेश करू शकतात. त्यामुळे किडनीशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. विशेषतः गरम पाणी प्लास्टिकच्या बाटलीत भरले, तर हा धोका आणखी वाढतो.
जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अहवालानुसार, प्लास्टिकच्या बाटल्यांच्या वापरामुळे शरीरात ‘मायक्रोप्लास्टिक’ प्रवेश करू शकते. प्लास्टिकच्या अतिसूक्ष्म कणांना वैज्ञानिक भाषेत ‘मायक्रोप्लास्टिक’ म्हणतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, सुमारे ९३% प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये हे हानिकारक घटक आढळतात. याचा परिणाम केवळ व्यक्तीपुरता मर्यादित राहत नाही, तर पुढील पिढ्यांवरही त्याचा नकारात्मक प्रभाव पडतो.
म्हणूनच, प्लास्टिकच्या बाटल्यांच्या तुलनेत काचेच्या बाटलीतून पाणी पिणे अधिक सुरक्षित आणि आरोग्यासाठी फायदेशीर आहे.